दिनांक 22 ऑगस्ट पर्यंतचा हवामान अंदाज ; काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता !

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ rain update ] : दिनांक 22 ऑगस्ट पर्यंत राज्यात हवामान कसा असेल , कोणत्या ठिकाणी पाऊस पडेल या संदर्भात हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

मराठवाडा दि.11-13 ऑगस्‍ट : दिनांक 13 ऑगस्‍ट पर्यंत राज्यातील मराठवाडा विभाग मधील लातुर , बीड , परभणी , नांदेड या जिल्ह्यांमध्ये रोज पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

पश्चिम महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्रात दिनांक 11-22 ऑगस्‍ट पर्यंत पुणे , सोलापुर , सांगली या जिल्ह्यांमध्ये दररोज पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून , दिनांक 15 ऑगस्टनंतर सदर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात दिनांक 15-22 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार असून , या कालावधीत धुळे , जळगाव , नाशिक , नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

विदर्भ विभाग : विदर्भ विभागांमध्ये दिनांक 16-22 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे , या कालावधीत वर्धा , चंद्रपुर , नागपुर या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

उर्वरित जिल्हे : दिनांक 17-22 ऑगस्ट दरम्यान राज्यातील सांगली , पुणे , मुंबई , कोल्हापुर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

Leave a Comment